शेतकऱ्यांना त्यांचे शेतमाल तारणावर तारण कर्ज देण्यात येते. हंगामाच्या काळात बाजारामध्ये शेतमालाची आवक वाढलेली असते. बरेचवेळा आवक जास्त असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शेतकऱ्यांना शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये व त्यांची पैशाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे निर्देशाने बाजार समिती स्वनिधीतुन शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येते. या विभागात शेतकऱ्यांने शेतमालावर आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन तारण कर्ज देण्यात येते.
